आजची सकाळच शांत होती.... ठरवून मिळविलेली शांतता.
त्यात आज आमच्या विभागासाठी मराठी प्रशिक्षण वर्ग होता. विषयाशी संबंधित पाठांवर so called विवेचन असेल अशा काहीशा दृष्टीकोनातून मी बऱ्यापैकी फक्त आणि फक्त श्रोत्याच्या भूमिकेत होते. समाधान दादांना तयारी करताना बघून आपणही काही करावे का .....मग फलकलेखन केले. फलक लेखन करताना 'मन में लड्डू फूट रहे थे' ....अरे काय करत आहोत आपण...मस्त तारीख, वार, मार्गदर्शिका वीणा ताई पाटणकर यांचे नाव... पण एवढे लिहूनही कोरडेपणा जाणवत होता...मग स्वाभिमानाचे भरते आले ...आणि कार्यक्रमाची tag line लिहिली- लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... थोडासा उर भरून आला...माझ्या स्वतःसाठीच वातावरण निर्मिती झाली आणि थोड्याच वेळात वीणाताईनी अगदी अनौपचारिकपणे व्याख्यान सुरू केले.
मराठी हा अध्यापनाचा विषय नसल्यामुळे पाठ्यपुस्तक , अभ्यासक्रम याविषयी माझी अगदीच उदासीनता होती. त्यामुळे नेमके कोठून ऐकू आणि कसे ऐकू याचा विचार सूरू होता. वीणाताई वातावरणात मोकळेपणा आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होत्या. अक्षरनंदन येथे २०.२२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर , मराठीच्या प्रेमापोटी, त्या अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून मराठी भाषेचा गोडवा शिक्षक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत होत्या. आपण जो यज्ञ सूरू केलेला असतो त्या यज्ञात आपण किती प्रकारे, नित्यनेमाने आहुती देवू शकतो ह्याचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या.
मराठी भाषेच्या धड्यांचे तास अनुभविले होते. पण आजचा तास हा मराठी भाषा शिकण्याचा होता. पानसे बाईंची प्रत्येक वाक्याला आठवण येत होती.आमच्या नसानसात त्यांनी, मराठी भाषेवरील प्रचंड प्रेम, स्वाभिमान जागृत केला. आज त्या सर्व गोष्टींची जणू उजळणी होत आहे याची जाणीव होत होती. आपल्या भाषेला आपण मातृभाषा का म्हणत असू ह्याचे उत्तर आज स्पष्ट झाले. ही भाषा आपल्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करीत असते. आपल्या भावना, आपली ग्रहणशक्ती, आकलन शक्ती, व्यक्त होण्याची कला हे सगळेच आपल्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे आहेत. मराठी भाषेच्या माध्यमातून हे कंगोरे विकसित होत असतात. मग एक अध्यापक म्हणून, व्यक्तिमत्व फुलविण्याचे साधन म्हणून, मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित झाला.
पाठ्यपुस्तकातील पाठांचे एका मुख्य विषयांतर्गत एकत्रीकरण करून, विद्यार्थ्यांना त्यांचा एकत्रित अनुभव कसा देता येइल, यावर वीणा ताईची खरोखरच mastery आहे. व्याख्यानाची सुरुवात कल्पनाशक्तीला साद घालून, स्मरणशक्तीला ताण देवून विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती कशी वाढवायची याने झाली आणि हळूहळू हे व्याख्यान साहित्यकृती पर्यंत येवून पोहचले. अभंग, भारुड, ओवी, कथा, रूपक कथा.....जस जशी एकेक नवे येत होती तसतसे आपले वाचन किती मागे पडले याची खंत जाणवत होती. पुस्तके आपल्याला किती अद्ययावत करीत असतात हे सर्वश्रुत आहेच, पण विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे व्रत घेतले असेल तर आपण स्वतः किती समृद्ध असावे याची जाणीव या व्याख्यानादरम्यान प्रकर्षाने झाली. छोट्या खेळातून , कृतीमधून आपण भाषेला साद घालू शकतो. माझ्या शालेय आयुष्यात पानसे मिस महिन्याभराचा स्वाध्याय देत असत. महिनाभर आधी निबंधाचे ५ विषय देत होत्या. जेणेकरून तो विषय आणि त्यासंबंधीचे विचार यावर महिनाभर अभ्यास व्हावा. एवढे नियोजनबद्ध असायच्या बाबी...
प्रमाणबद्ध भाषा आणि बोलीभाषेचा लहेजा यावर देखील चर्चा झाली. भाषेचे सौंदर्य आपल्याला जपता आलेच पाहिजे, त्याचा गोडवा, ते साहित्य , ह्या बाबी त्या भाषेचा विशिष्ट ठेवा आहेत. अशा सर्व लोकांशी संवाद साधून त्यांना देखील त्यांच्या भाषेविषयी comfort zone आपल्याला देता आला पाहिजे.
असे एक ना अनेक मराठीची दालने आज माझ्यासाठी पुन्हा उघडली गेली. मनसोक्तपणे त्यामध्ये किती पाहू, किती वेचू, किती साठवू अशी तारांबळ देखील उडाली. दीर्घकालीन किती राहील हे आत्ता नाही सांगू शकत ....पण आज खऱ्या अर्थाने कान तृप्त झाले. आणि हे सर्व भाव ओळखूनच की काय पण व्याख्यानाचा शेवट 'मनकवडा मोर' या कवितेने झाला.....ज्याचे मोरपीस अंगावरून फिरल्याचा आनंद या वीणाताईनी नक्कीच दिला.
Sundar lekhan shaily..... Smita lekhanatun tuze bhasha saudary mastch
ReplyDeleteThanks a lot...आपली ओळख कळेल का..
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteफारच सुंदर लेखन. कधी लिहीता हे सगळं.
ReplyDeleteमनात आले की लगेच 😀
DeleteAs usual zakas..
ReplyDeleteछान
ReplyDeleteमस्त लिहिलंय..
ReplyDelete