Tuesday, 27 March 2018

Chillax.....
     माझ्या शब्द कोशामध्ये नवीन शब्दाची भर पडली . Chill आणि relax यांच्या एकत्रीकरणातून Chillax ची उत्पत्ती झाली. .आणि याचे जनक म्हणजे सध्याचा teenage group..जो त्यांच्या आई वडिलांना शांत करण्यासाठी, प्रेमाचा सल्ला म्हणून CHILLAX हा शब्द प्रयोग करत आहे. अर्थातच या शब्द प्रयोगाने आई वडील शांत होत आहेत की अजूनच tense हे त्यांच्या प्रकृती वर अवलंबून आहे.
मी मात्र chillax ऐकून जरा curious झाले.
     एक वेगळ्या धाटणीचा शब्द प्रचलित झाला आणि तो आपल्यापर्यंत पोहचला याचा भलताच आनंद मला झाला. 'Swag से करेगे सब का स्वागत ';अशा attitude मध्ये मला chillax शब्द प्रयोग करावा अशी प्रचंड इच्छा निर्माण झाली . किती cool...cooler...coolest approach..तो पण teenager चा.
     या अनुषंगाने दोन गोष्टी प्रामुख्याने माझ्या समोर आल्या; एक तर, भाषेत प्रचंड वेगाने होत जाणारा बदल ,प्राकृत मराठी पासून , शुद्ध मराठी, प्रादेशिक मराठी, सदाशिव पेठ मराठी, असा सगळा मातृभाषेचा अभिमान जपणारा आपला गट हळुहळू Minglish, whatsapp marathi , english shortcuts, english combo असे काय काय नवे प्रयोग करत आहे आणि मुख्यत्वे हे बदल खूप सहज स्वीकारले ही जात आहेत. त्या मागचे एक कारण- जर हे भाषेत होणारे बदल मी स्वीकारले नाहीत, तर या communication च्या जगात मी मागे पडेल.. .so,मातृभाषेचा आदर मनात सदोदित उराशी बाळगून ,सद्य स्थितीत chillax राहून मी हा बदल आत्मसात करणार ...कारण मला सध्या जगाची भाषा कळणे आणि येणे जास्त महत्त्वाचे आहे . अजून दहा वर्षांनी जेव्हा माझा मुलगा या teenage चा घटक बनेल तेव्हा हा शब्द कोश किती आणि कसा 'प्रगल्भ ', 'संपन्न' असेल याची मी कल्पना करु शकत नाही परंतु,  त्या साठी mentally prepare राहू शकते, हे मात्र नक्की.
      दुसरी बाब हा chillax म्हणणारा गट , एखाद्या घटनेची तीव्रता ओळखून ,परिणामांची कल्पना ठेवून,  त्या परिणामांना सामोरे जाण्याची पात्रता असणारा असल्यामुळे, प्रगल्भतेपोटी हा शब्दप्रयोग करत आहे का ?जर तसे असेल तर, त्यांचे हे वागणे कौतुकास्पद आहे ,कारण spiritual development आपल्याला सरतेशेवटी प्रत्येक घटनेचा शांतपणे च विचार करायला सांगते . ही अभिप्रेत असणारी शांती मिळविण्यासाठी सध्याचा प्रौढ वर्ग अनेक meditation ची दारे वाजवित आहे . प्रगल्भ teenage ला (?) हे अशाप्रकारे शांत राहणे लवकर लक्षात आले ;याचा नक्कीच आनंद
पण chillax शब्दप्रयोग करताना प्रत्येक गोष्ट lightly च घ्यायची ही प्रवृत्ती असेल तर, मात्र थोडी काळजी नक्कीच वाटेल. कारण कशाचा काही फरकच पडणार नसेल तर ....जगणे कोरडे बनेल ....chillax चा शेवट कोरडे पणात नसावा ...नाहीतर हळू हळू ही शांती आपल्यालाच खायला उठेल !!!
       शब्दांची गंमत, भाषेतील बदल, हे काळानुरूप घडतच राहणार .. त्यात शंका नाही. ..पण एखाद्या वाहिनी वर 'मी मराठी' हे गाणे ऐकून वा 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे पद ऐकून क्षणभर काळजाचा ठाव घेतला गेला नाही तर मात्र ही वृत्ती आक्षेपार्ह ठरेल. .....
आई वडिलांना Chillax म्हणताना त्यांच्या मनातील काळजीचा वेध घेता येणार नसेल तर ही वृत्ती देखील आक्षेपार्ह ....आई वडिलांचे आयुष्य chill आणि relax ठेवण्याचे दायित्व आपल्याला chillax राहून घेता येईल का यावर एकदा फिरून विचार व्हावा ....एवढंच म्हणणे
Happy with this new word
    

Monday, 12 March 2018

अनाकलनीय

       आज cocktail हा पिक्चर बघत होते.  माझ्यासाठी काही चित्रपट हे ठेवणीतले असे आहेत , Jab we met, Namaste London,  3 idiots, कट्यार काळजात घुसली, .. त्यापैकीच Cocktail हा एक . या  चित्रपटामध्ये कोणताही समान धागा नाही , तरीही ते मला एका जागी खिळवून ठेवतात  हे  मात्र नक्की . शेवटी 'चित्रपट' ही व्याख्या  पूर्ण होण्यासाठी , त्यांचा शेवट हा गोड होणारच पण; ती जी overall process आहे ना ,ती मनाला स्पर्श करुन जाते ...किंबहुना ,तिचा प्रभाव, हा दिर्घकाळ टिकतो. 
       Cocktail मध्ये सैफ चा एक dialogue आहे,  "मै ऐसा हो ये कभी नही चाहता था "(when he finally fell in love with Diana), पण, Alas!! घडलेच ... पिक्चरच तो ...घडून येणारच होते असे .
     पण ज्या पध्दतीने घडले ती process खूपच आगळी होती . 
आपण खरोखरच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत mentally prepared नसतो. हे फक्त प्रेम किंवा तत्संबंधी नाही. ...खरोखरच आपण खूप साऱ्या बाबतीत prepare नसतो,  आपली acceptance level तेवढी powerful नसते आणि मग त्यांचा प्रभाव वाढत गेला की  आपले calculations चुकू लागतात ...अरे, अस घडावे ? माझ्या बाबतीत घडावे? कस शक्य आहे हे? ही phase किती दिवसांची सोबती? कस निभावून नेणारे सगळ? असे अनेक प्रश्न.. ...आपण किती strong आहोत हे फक्त आणि फक्त आपल्यालाच माहित असते . मग calculations बरोबर येण्यासाठी आपण manipulation करु लागतो .
     त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा घाट सुरू होतो.  उत्तरे शोधत आहोत की  अजून खोल गर्तेत जात आहोत हे सर्वस्वी आपल्या कौशल्यपूर्ण विचारांवर आधारित असते .
    कार्यकारणभावावर सगळा खेळ सुरु असतो. ही जी कार्य कारणभावाची अनाकलनीय अशी process आहे ना ती मला खूप important वाटते. कारण शेवट तर नेहमीच गोड होणार असतो , या शेवटाकडे जाताना तुम्ही ज्या पध्दतीने तग धरता...That sounds your perfection 😌
      तुम्ही म्हणाल एवढा छान हलका फुलका चित्रपट , relax व्हायच की तत्त्वज्ञान शोधत बसायचे 😺 परंतु हलक्या फुलक्या गोष्टीतूनच जीवनाचे मर्म कळते ना ...लहानपणीच्या  गोष्टी आजही आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात .
      मला समजलेला मानवी स्वभाव म्हणजे कोणत्याही प्रसंगात माणूस त्या ठिकाणी स्वतःला judge करत असतो , चित्रपट तर त्याची हक्काची जागा!!!आपण काय केले असते बरे ? किंवा या गोष्टींपासून आपण दूर आहोत हेच बरे! !!कदाचित माझा हा विचार  स्वाभाविकच असावा .
       आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आपण विचार करो वा न करो,  आपण Strong असो वा नसो,  त्या घडत राहणारच. तुमचे calculations पुर्ववत करावयाचे असतील तर तुम्ही किती लवकर त्या घटनेचा स्वीकार करता यावर गोष्टी अवलंबून असतात. ..
        Afterall हे आयुष्य, अनाकलनीय बाबींचा उलगडा करण्याचा एक महायज्ञ ...सो आप चाहो या ना चाहो ;हे सगळं घडत राहणार आणि या महा यज्ञ तुम्हाला तुमची आहुती द्यावी लागणार. ..शेवटी इदम न मम ..हाच गोड शेवट ना !!,😊

Wednesday, 7 March 2018

स्वच्छंद हितगुज🐤
मनामध्ये खूप गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. आपली विचार करण्याची सवय, त्यावर झालेले संस्कार, आजूबाजूची परिस्थिती ,त्यांना मिळालेले exposure या आणि अशा अनेक बाबींवर, आपली प्रगल्भता अवलंबून असते. आपले विचार व त्या नुसार घडणारी आपली कृती ही ,आपल्या प्रगल्भतेच द्योतक असते😌 .
प्रत्येक माणसाशी, हे  सत्य निगडित आहे. जन्मापासून मरेपर्यंत जर मोजदद करण्याची ठरविली, तर infinite प्रसंग आपण अनुभवलेले असतात.
सामोरी येणारी व्यक्ती आपल्याला कधी प्रेमळ भासते, तर कधी रगेल, कधी प्रचंड aggressive, तर कधी friendly. तिची कृती ही, तिच्या अनुभव संपन्नतेवर आधारित असते . अगदी सहज म्हणून कधी माणसांना observe केलं, तर लक्षात येत  कुठे ना कुठे, प्रत्येक माणसामध्ये एक innocence, निर्मळता नक्की असतेच. तरीही त्यांचे पुर्वनुभव त्यांना निर्भेळपणे व्यक्त होण्यापासून अडवतात. आणि हे अस व्यक्त होणे रोखले गेले की संवाद खुंटतात.😐

अस खुंटलेल विसंवादि आयुष्य किमान आपल्या नशिबी नको म्हणून व्यक्त होणे माझ्यासाठी  खूप महत्वाचे.. .त्यासाठी माणसे जपणे. कारण सरतेशेवटी We all sail in same boat.
मग प्रवास सुखकर होण्यासाठी हा व्यक्त होण्याचा घाट. .
काहींना काही निमित्ताने भेटत राहू,  बोलत राहू , जगत राहू आणि आपण जिवंत मनाचे आहोत हे कमीत कमी स्वतःला सांगत राहू .
धन्यवाद 😊