Sunday, 19 April 2020

वर्तमान जगताना....

.
            Hi.... सगळं कसं चिडीचूप झाले आहे ना.... मला हे करायचे , मला ते करायचे, हे असेच झाले पाहिजे, मला असेच लागते... मला वाटलं म्हणून हे केले. सगळच शांत एका क्षणात... सगळं कडीकुलूप बंद! मग कशासाठी होती ही धडपड.... केवळ कटपुतली आहोत  का आपण? पुन्हा पुन्हा हेच सिद्ध होणार आहे का? ‘आनंद’ चित्रपटमधला famous dialog..बाबू मोशाय... ‘हम सब तो रंगमंच की कटपुतलीया है!’
            If you can’t go out side go inside! अनेकांनी हे या आधी बऱ्याचदा सांगितले. पण ..पण आता ते बहुतेक पटायला लागले असावे म्हणून अनेकांच्या whatsapp status वर झळकत आहे. मानवी जन्म लाभला आहे हो मला. भूक, भय, निद्रा, मैथुन या चार गरजा मला प्राणी या जगतात स्थान देतात. but...m gifted one! माझी बुद्धी..मला मिळालेली ही देणगी मला कालपरवापर्यंत उच्च स्थान देत होती. मला पडणारी स्वप्ने मला स्वस्थ बसू देत नव्हती. शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य या नवरसांनी मी नटत होतो. माझे भविष्य लिहिण्याचा आणि घडविण्याचा अविरत प्रयत्न करत होतो. नजर केवळ भविष्याचा वेध घेत होती. तिथपर्यंत पोहचायचे आहे. त्यासाठी हा protocol. तो continuously follow करायचा. हा कोरोना येईपर्यंत या दिनक्रमात काहीच fault नव्हता. आम्ही आनंदी होतो, सुख दुःख जसजशी येत होती त्याला सामोरे जात होतो. आम्ही जगत होतो.
            पण आता... एका क्षणात सगळे statue ! भविष्य नेहमीच अंधारात असते हे पटायला लागले.
आपण नेमके का जगत आहोत? या जन्माचा काय नेमका हेतू? हे प्रश्न आता पडायला लागले आहेत. आपला survival factor नेमका काय आहे? आजचा दिवस माझ्या आयुष्यात आला आणि हा दिवस मी नेमका कसा जगत आहे? कामासाठी मी आहे की माझ्यासाठी काम आहे? जगण्यासाठी जी जी आवश्यक कौशल्ये असतात ती मला माझ्या शाळेने, कुटुंबाने, परिस्थितीने  दिली आहेत का? परिस्थितीला तोंड देण्याची भावनिक, आर्थिक कुवत माझ्यामध्ये आहे का? माझी मानसिक आणि शारीरिक क्षमता यांचे लागेबंध आहेत का? या सर्वांची उत्तरे शोधण्याची ही वेळ आहे. उत्तरे जर “नाही” असतील तर मी केवळ परावलंबी आहे... हातात असलेला वेळ ही उत्तरे “हो” कशी करता येतील यावर काम करण्याचा आहे असे नक्की वाटते.
            हे lockdown कधी संपेल आणि काय याचा जर सतत विचार करत राहिलो तर पुन्हा पुन्हा तीच चूक करू... अंधारात असलेल्या भविष्यासाठी आधी शरीराची तगमग केली आता मनाची घालमेल करू. खूप प्रश्न आहेत. खूप... नोकरी टिकेल की नाही, व्यवसायाचे काय होईल? घराचे, गाडीचे हप्ते या प्रश्नापासून आज संध्याकाळी जेवण मिळेल की नाही इथपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न निर्माण झाले आहेत. आज account ला पैसे आहेत पण खर्च कुठे करायचा हा प्रश्न आहे आणि दुसरीकडे सरकार मदत देऊ करत आहे पण माझ्याकडे account च नाही असे प्रश्न आहेत. सगळेच जण एका स्तरावर आलेले आहेत. आयुष्य टिकवायच आहे... बस... सर्वांची एकच इच्छा!
सध्या दुसरा दिवस आपल्या आयुष्यात येणे हाच बोनस असणार आहे.
शाळेत हसरी बोल फुले काव्य संग्रहच्या निमित्ताने नवा दिवस ही मंगेश पाडगावकर यांची विश्वास जागवणारी कविता वाचनात आली. सध्या साहित्य वेगवेगळ्या स्वरुपात इतके भेटीस येत आहे की आपल एवढे वाचन राहिले होते हा प्रश्न  पडावा. प्रत्येकाला काही ना काही सांगायचे आहे. पण ऐकणारा समोर नाहीये. मग त्याला अनेक माध्यमातून मी सांगत आहे, त्याचे ऐकत आहे. मला जगण्यासाठी हे संभाषण आवश्यक आहे. मला हितगुज करायचं आहे, ते ऐकणार, समजून घेणार कोणीतरी हवं आहे.  मग ते सार्थ तत्वज्ञान असो किंवा वायफळ बडबड असो, हे संभाषण मला हवे आहे. इतके दिवस ज्या मोबाईलला सगळे दोष देत होते, तोच आज तारणहार म्हणून मदतीला आला आहे. ज्ञान, मनोरंजन, भाव सगळी गरज तो भागवत आहे.
हेच सगळे दृष्टिकोनातील बदल घडत आहेत.. स्वतःमध्ये होणारे बदल अनुभवा. हा दिवस, हा क्षण मी कसा घालवत आहे हे बघा. मज्जा येते. एक वेगळा आनंद असतो. मी बदलत आहे हे आपलं आपल्याशी एक गुपित आहे. “बदल अपरिहार्य असतो’ या बदलाचे आपणच आनंददायी साक्षीदार या वर्तमान घडीला होऊया.
            कोणताही बदल आचरणात आणायचा असेल, कोणतीही गोष्ट सवयीची व्हायची असेल तर ती किमान 90 दिवस करावी लागते. चीनचा lockdown 90 दिवसांचा होता. घरात राहणे हे सवयीचे होऊ लागले तर? आज जसे घरात राहणे त्रासाचे तसे उद्या बाहेर पडण्याची वेळ आली तर ते त्रासाचे होऊन कसे चालेल?
            आपल्याला आपला survival factor सक्षम बनवता आला पाहिजे. जो मला परिस्थिती समोर उभे राहण्यास मदत करेल. परिस्थितीनुसार माणूस बदलतो. त्याला बदलावे लागते. तर आणि तरच तो तग धरू शकतो. पण हा बदल जेवढ्या लवकर स्वीकारला जाईल तेवढ्या लवकर वर्तमान सुकर, सुसह्य होत जातो. याच भूमिकेतून  भविष्य पण कधीतरी वर्तमान होणारच आहे की. तो वर्तमान पण तितकाच सुकर, सुसह्य होईल.  
            आजचा क्षण साठवूया... समृद्ध करूया... तोच शिदोरी म्हणून साथ देणार आहे. 

Wednesday, 1 April 2020

फेरफटका


Scene १
       'अभिषेक, ए  अभिषेक उठ बरे... ५.३० वाजून गेले ..उठ बर..मी किचनमध्ये कधी जाऊ? सगळा वेळ तुला उठवण्यात जाईल ..उठ पटकन... आगाशे काका वेळेत येतात...चांगलं वाटतं का त्यांना वाट पहायला लावण .... झाली दिवसाची सुरुवात....तीन डब्यांमध्ये काय काय दिले ....कोणता पदार्थ आवडीचा आणि त्याच्या बदल्यात कोणता पदार्थ compulsory खायचा याची आठवण करून देऊन वेळेत रिक्षा गाठली...
       चला आता मस्त गाणी ऐकत ४ फेऱ्या माराव्या...दिवस माझा करून घ्यायचा असेल तर हा musical dose must आहे. चालताना आपण एकटे असल्याचा फील न येता आपण आपल्या विश्वात राहिल्याचा फील देतात ही गाना वरची गाणी... वा दिन बन गया....ओ लडकी beautiful......दिवसभर हे गाणे आता गुणगुणायला मोकळी...
Scene २
       ओ ...अहो.. नाष्ट्याला पोहे....चहा रेडी आहे.... डबा घ्यायला कोणाला पाठवणार आहात...अभिषेक ३.१५ वाजता सुटेल..कोण घ्यायला जाणार आहे. वेळेत पाठवा... नाहीतर हे पोरग मला call करत बसतं...मी तासावर असते ..फोन नाही घेऊ शकत...
       माई चहा झाला आहे... हा कोणी प्रसाद दिला आज? तुमच्या योगासनाला बर आहे..देवदर्शन चालू असतं सतत कोणाचं तरी...यावेळी कक्कर aunty की देसाई काकू....आज दोडक्याची चटणी आणि मटकी करते...
तोपर्यंत कानावर हाक....”कुठे आहेत अण्णा?” “काय काका जिम ला जाऊन आला का?” स्मिता madam मस्तपैकी आल्याचा चहा करा...डॉक्टर काका आले आहेत. इति अण्णा... हो अण्णा ....इति मी ...
       “ताई आम्ही आलो ....” “धन्यवाद ...तुम्ही घरात येईपर्यंत माझा जीवात जीव नसतो....” “अहो ताई येणार म्हणजे येणार”....लई काळजी करता... बर किती चपात्या किती भाकरी... सांगा पटापट....इति आमच्या दोन्ही मावश्या....
       “माई थोडं परीक्षांची काम सूरू आहेत , यायला उशीर होईल....येते मी ..अभिला जास्त झोपू देऊ नका....”
Scene ३
       ९५ बिग FM वर मस्त गाणी... जुनीपुराणी .... माहोल बन गया... देवा.. हे चौकातले रिक्षा वाले कधी सुधारायचे...फूट पाथवर टू व्हीलर... आवारा ... या बसेस तर ... त्यांच्यासाठी separate रोड, separate सिग्नल..तरिही हा असा performance ... भगवान उठा ले रे ..उठा ले...
       मातोश्रीकडे चक्कर मारावी आज जरा...कालच आल्या आहेत गावावरून... मनुताई एक कप चहा? ...बाबा फक्त चहाच...आईला सांगा उपाशी निघालेली नाहीये घरातून ..उशीर झाला आहे... आई, ताई फक्त तुम्ही आल्यावरच येतात ..इति स्नेहल आणि श्रीकांत .... मनू चल शाळेत आपलं तू माझ्याबरोबर ...आत्तुला सगळे रागावतात ..तूच माझी चल....
आज बाहेर बऱ्याच गाड्या दिसत आहेत...मनोहर मध्ये काही कार्यक्रम की पालक बैठका....hi मिस करणारी ही पोर... नुसतं म्हणायला शाळा ११-६ ..सकाळी ९/१० वाजल्यापासून शाळेत रमतच असतात ...ग्राउंड भरलेले बघायला मज्जा येते... हे शंभू सर ग्राउंड नुसते स्वतःचे करून टाकत असतात...आज मातृमंदिरमध्ये गुरुकुलाचा कार्यक्रम आहे वाटतं..बरीच तयारी सूरू आहे...गाडी लावायला जागा मिळाली ..hushhh
Scene ४
good morning लोलिता...कशी आहेस... आज आमच्यासाठी काही bulletin चा खाऊ.... “विद्यामिसने दिला की आणतेच” “धन्यवाद madam....चला दिवस सूरू झाला आमचा आणि तुमचा पण....” माणसांच्या की टेबलवरच्या कागदांच्या गराड्यात असणाऱ्या शिवराजदादाचे दर्शन झाले....आमच्या डोक्यातील विषय मांडायला कधी वेळ होणार कोणास ठाऊक? शीतल ताईच किती वेळा व्यासमुनी व्यासमुनी करत येऊन गेली आहे... असो..
वा..इतनी शक्ती हमें दे ना दाता...आपली आवडती प्रार्थना... कर दे पावन हर इक मन का कोना.... मस्त म्हणाल्या मुली...विद्या मिसचे विद्यार्थ्यांचे कौतुक करणारे निवेदन...वावा यावर्षी भरपूर बक्षिसे झाली ..मस्त
दाराशी वाट बघणारे आर्या, ज्ञानेश्वरी, श्रीपाद, डेस्क च्या बाजूला बसणारे श्रुती, अथर्व , सई, ओरडणी खाणारे प्रणव, वेदांत हांडे, आत्रेय, आभोणकर, फिसिफिसी हसणाऱ्या प्राप्ती, ऋतुजा ...लक्ष देऊन ऐकणारी सृष्टी, ओजस्वी... सगळेच माझे.... काहीही बोला... मिस म्हणत बिलगायला येतातच...
हा आख्खी शाळा फिरणारा प्रथमेश नारळे आणि कृष्णा मोटे, तासाला जस काही मला उचलून घेऊन जायचं आहे अशा आवेशात तासाला बोलवायला आलेले श्लोक, सार्थक आणि प्रसाद, स्टार मिळविण्यासाठी मागे लागणारे सिद्धी, आकांक्षा, शौर्य, गंधार, तासाला आपल्याच धुंदीत असणारा ओम, शिव, शिवम...
मिस तुम्ही सांगा हो फक्त ..करतो असे म्हणणारी विस्मया, काहीना काही सांगायची चिमट असणारी वैदेही, सांज, वसुंधरा, उत्तरे बरोबर आली किंवा चुकल्यावर चेहऱ्यावर भाव उमटवणाऱ्या सृजा, आर्या, सृष्टी, मृदुला , राधिका.... अरे सगळ्याच बोलक्या.... गोंधळ न घालता चेहऱ्याने बोलणाऱ्या माझ्या लेकी, प्रश्नांचे भांडार असणारा ईशान, कपाळावर आट्या असणारा शिवांग, डोळे मिटून दूध पिणारा शाश्वत आणि अपूर्व, याच्यावर रागवावं की हसावे असा माझा गोंधळ करणारा स्वराज... कसेही असेनात का ..मनापासून ऐकतात माझ... भारी वाटतं...वर्गाचा कोपरा न कोपरा बोलका असतो...
Scene ५
“जेवायला कोण कोण येत आहे? मला भूक लागली आहे...मी सुरुवात केली आहे ....माझा नंतर तास असतो....” आलोच ताई ...एक मिनिट....जिना चढत आहे.... तुम्ही बसा ...माझी एक meeting आहे आत्ता...श्रीराम, अवधूत, आदित्य, अस्मिता, गायत्री, प्रियांका, कल्पेश  आणि मजल दरमजल करत येणारी आरती...अवधूतचा गरमागरम डबा आणि आजची भाजी ओळख...मेथी की तांदुळाचा...असा तोंडी लावायला प्रश्न आरतीचे चारचार डब्बे.... श्रीराम च्या collection मधले हटके गाणे आणि दिलखुलास गप्पा....एकदम स्वच्छंद .... सोयाबीन ते आगगाडीच्या डब्यापर्यंत यथेच्छ विहार...मध्येच प्राचार्यांच्या  ऑफिसमध्ये असणारा दहावीचा  बोर्ड सगळेजण वाचून येतात....आणि all is well म्हणत म्हणत डबा संपवतात...
Scene ६
असाच दिवस उतरणीला लागायला लागतो...देवळेकर सरांच्याकडे जायचे तर आधीच waiting ला चार जण दिसलेले असतात....ऑफ तासाला bulletin असतं किंवा पेपर टायपणं असतं किंवा अकारिक तपासणी ...किंवा कार्यशाळा काम, वृत्त लेखन, फोटो संकलन  किंवा ppt बनवणे आणि हे काही नसेल तर कधीकाळी घेतलेली उचल ..त्याचा हिशोब पुरा करणे असतेच किंवा etech माहिती पुरवणे किंवा याद्या print काढून देणे हे तर असतेच असते. येता जाता समाधान दादा ... ताई आपल्याला हे करायचं आहे बर का.... मस्त करू आपल्या विभागाचं.... असं सुचवण असतं... कामथे सर, वर्षा ताई, आंबेकर मिस, दीपाली ताई, स्वाती ताई, सुपे ताई, सीमा ताई,श्वेतल ....हे झाले का....ते झाले का.... जरा म्हणून उसंत नाही.....पण मस्त कामे झाली आजची....दादाला reporting..... स्वाहा .... झाले...केले....करत राहणार.....

Scene ७
हे सगळ करायचं म्हणजे energy ड्रिंक ..चहा तर हवाच.... त्याशिवाय का हे शक्य.... घंटा वाजायच्या आत मन स्वयंपाक घरात गेलेले असते नाही तर चाय अड्डावर पोहचलेले असते...कसं सुचत जात मस्तपैकी...चहाचा एकेक घोट घेता घेता....
संपला दिवस....पोहचलो घरी.... लेकाचे reporting....एक मस्त पडी.... आवराआवरी.....आणि उद्याची तयारी.....
अरे उठले की ....परत....पण काय .... सकाळचे सात वाजले...५.३० नाही....काही घाई नाही गडबड नाही.... एकदम निवांत ....अग, मन वेगाने धावत फेरफटका मारून आलेले आहे.... तू निवांत विश्रांती घे आत्ता.... तुझ्यानुसार चाल... इतके दिवस घड्याळाबरोबर पळत होतीस....